बैसूनिया कशावरी
शंखोबाची निघे स्वारी ?
गोगलगाय गोगलगाय
दोन शिंगे बिनापाय !
ऐटीमध्ये पाठीवरी
शंखोबाची बसे स्वारी !
चाल हिची मंद अशी
तीन वाव दार ताशी !
असा काही हिचा थाट
मागे चमचम करी वाट
अंग हिचे लोळागोळा
काय तरी अंगी कळा !
शंखोबाचे छत्र वर
तेचअस्त्र, तेच घर,
नाही पाय, नाही पंख
अकलेचा वरी शंख
नका म्हणू रे टोचूनी
गोगलगाय माझी गुणी,
भयभीत जेव्हा होते
शंखामाजी ही दडते
चतुर हि आसे भारी
जीवालागी जपणारी
पीळ देऊनी पोटाला
निघे आपुल्या कामाला
हळू मार्ग आक्रमीत
गेली गेली, झाली गुप्त !
शोधा बघू, जा जा थेट
चमचमणारी वाट !
सापडेल तुम्हांलागी
चाललीसे निजमार्गी.
गोगलगाय पोटात पाय
म्हण खोटी नव्हे काय ?
— सोपानदेव चौधरी
A NON-PROFIT
A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR
रम्य ते बालपण!
'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.
साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!
साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!
सुचना:
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.
येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.
ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.
कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.
येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.
ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.
कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !
- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
4 February 2021
गोगलगाय
2 February 2021
कोकिळ
बहुत मधुर ऐशा काढिशी तू रवाला l
परिसुनि बहू लागे नाद माझ्या मनाला ll
टकमक बघतो मी कोठ काही दिसेना l
मधुर कुठून येई शब्द हेही कळेना ll
तरुवर दिससी ना पर्वतीही न पाही l
अवनितल रिकामा, कल्पना होत नाही ll
झुडुप हलत नाही थोर आश्चर्य आहे l
खग न मजसि वाटे शब्द हा धावताहे ll
जवळ रव निघावा तोच तो लांब जावा l
परिसुनि मग का हा जीव ना गोंधळावा ll
अवनितलि निघे हा, की दरीतून येई l
समजत मज नाही की नभी जन्म घेई ll
फिरून फिरून येई शब्द ऐकावयाला l
बहुत रिझवितो तो माझिया बा मनाला ll
जलद जलद चाले रूप पाहावयासी l
त्वरित पळुन तुही फार तो दूर जासी ll
बघुनि परि तुला मी पावलो फार तोष l
लवकर पळसी तू कोकिळा हा न दोष ll
बसुनि परि कुठेही गोड वाणीस काढी l
परिसुनि रव माझे चित्त घेईल गोडी ll
हरित बहुत ऐसे शोभती पंख ज्याला l
सुबक अमल चंचू लाजवी पोवळ्याला ll
मधुर वदुन शब्दां तोषवी मानवाला l
धरुनि जन अशाही कोंडिती की शुकाला ll
म्हणवुनि तुजलागी धाक वाटे जनांचा l
पळुन करिसि वाटे आसरा काननाचा ll
परि न समचि मानी कोकिळा सर्व लोक l
धरुनि तुजसि द्याया इच्छितो मी न षोकं ll
तरुवर सुफलांनी युक्त झाले कितीक l
कुसुमित दिसताती हे किती येथ देख ll
झुळ झुळ झुळ आहे मंद वाहात वात l
निज किलबिल शब्दे पाखरे बोलतात ll
सुरूचिर वनशोभा सोडुनी पिंजर्यात l
रुचि न तव मनाला राहणे दे निवांत ll
मम मन न कधी बा इच्छिते जे अनिष्ट l
तुज बहु गमते ते हो स्वचित्तास तुष्ट ll
परि न सकळ माझ्यासारखे लोक पाहे l
म्हणवुनि पिकराया दूर तू दूर राहे ll
बसुनि वरि तरुच्या गोड वाणी वदे तू l
पुरविन मनिचा मी येथ येवून हेतू ll
— मो. ग. लोंढे
परिसुनि बहू लागे नाद माझ्या मनाला ll
टकमक बघतो मी कोठ काही दिसेना l
मधुर कुठून येई शब्द हेही कळेना ll
तरुवर दिससी ना पर्वतीही न पाही l
अवनितल रिकामा, कल्पना होत नाही ll
झुडुप हलत नाही थोर आश्चर्य आहे l
खग न मजसि वाटे शब्द हा धावताहे ll
जवळ रव निघावा तोच तो लांब जावा l
परिसुनि मग का हा जीव ना गोंधळावा ll
अवनितलि निघे हा, की दरीतून येई l
समजत मज नाही की नभी जन्म घेई ll
फिरून फिरून येई शब्द ऐकावयाला l
बहुत रिझवितो तो माझिया बा मनाला ll
जलद जलद चाले रूप पाहावयासी l
त्वरित पळुन तुही फार तो दूर जासी ll
बघुनि परि तुला मी पावलो फार तोष l
लवकर पळसी तू कोकिळा हा न दोष ll
बसुनि परि कुठेही गोड वाणीस काढी l
परिसुनि रव माझे चित्त घेईल गोडी ll
हरित बहुत ऐसे शोभती पंख ज्याला l
सुबक अमल चंचू लाजवी पोवळ्याला ll
मधुर वदुन शब्दां तोषवी मानवाला l
धरुनि जन अशाही कोंडिती की शुकाला ll
म्हणवुनि तुजलागी धाक वाटे जनांचा l
पळुन करिसि वाटे आसरा काननाचा ll
परि न समचि मानी कोकिळा सर्व लोक l
धरुनि तुजसि द्याया इच्छितो मी न षोकं ll
तरुवर सुफलांनी युक्त झाले कितीक l
कुसुमित दिसताती हे किती येथ देख ll
झुळ झुळ झुळ आहे मंद वाहात वात l
निज किलबिल शब्दे पाखरे बोलतात ll
सुरूचिर वनशोभा सोडुनी पिंजर्यात l
रुचि न तव मनाला राहणे दे निवांत ll
मम मन न कधी बा इच्छिते जे अनिष्ट l
तुज बहु गमते ते हो स्वचित्तास तुष्ट ll
परि न सकळ माझ्यासारखे लोक पाहे l
म्हणवुनि पिकराया दूर तू दूर राहे ll
बसुनि वरि तरुच्या गोड वाणी वदे तू l
पुरविन मनिचा मी येथ येवून हेतू ll
— मो. ग. लोंढे
Labels:
कोकिळ>,
छंद-बद्ध,
मो. ग. लोंढे ( १८५४ – १९२०)
शिशिर ऋतूचं गान
हलके हलके हसते गळते तरुचे पान न् पान
पानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
पानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
पानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
— वा. रा. कांत
बाई, तरुचे पान न् पानपानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
बाई, शिशिर ऋतूचं गान !
हिवात राने पिवळी पडलीनक्षत्रांची रात शहारे गारव्यात हैराण
उषा धुक्यामधि ही काकडली
ओठच उलले संध्यालाली
पानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
बाई, शिशिर ऋतूचं गान !
थंडगार किति पवन झोंबतोगळेल वाटे चांदण्यात हे निळे नभाचे पान
ऊन्हाच्याहि उरि काटा उठतो
पानफुलांचा बहर झडपतो
पानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
बाई, शिशिर ऋतूचं गान !
फुले जळाली, पाने गळलीपिवळ्या पानांच्या मनि फुलते वसंतस्वप्न महान
फळांत जरि रसधार गोठली
सर्व सृष्टि जरि हिमे करपली
पानझडित या ऐकुन घ्या ग शिशिर ऋतूचं गान
बाई, शिशिर ऋतूचं गान !
— वा. रा. कांत
31 January 2021
एक अश्रू
स्वातंत्र्याचा सण, दारात रांगोळी
श्रुंगारली आळी, झगमगे ll १ ll
तोरणे, पताका, सांगती डोलुन
स्वांत्र्याचा दिन, उगवला ll २ ll
स्वातंत्र्यासाठी या, आम्ही काय केले ?
पुर्वज श्रमले, तयासाठी ll ३ ll
वृक्ष लावणारे, निघोनिया जाती
तळी विसावती, सानथोर ll ४ ll
विचारी गुंतत, हिंडलो बाजारी
पेठेत केवढी, गजबज ll ५ ll
केवढी धांदल, केवढा उल्हास
केवढी आरास, भोवताली ll ६ ll
मात्र एका दारी, दिसे कोणी मात
दीप ओवाळीता, छायाचित्रा ll ७ ll
ओल्या नेत्रकडा हळुच टिपुन
खाली निरांजन, ठेवीत ती ll ८ ll
हुतात्म्याचे घर, सांगे कुणी कान
चित्त थरारोनी, ऐकतसे ll ९ ll
होते लखाखत, पेठेतले दीप
आकाशी अमूप, तारा होत्या ll १० ll
चित्तापुढे माझ्या, एक दीप होता
एक अश्रु होता, माऊलीचा ll ११ ll
— वि. म. कुलकर्णी
श्रुंगारली आळी, झगमगे ll १ ll
तोरणे, पताका, सांगती डोलुन
स्वांत्र्याचा दिन, उगवला ll २ ll
स्वातंत्र्यासाठी या, आम्ही काय केले ?
पुर्वज श्रमले, तयासाठी ll ३ ll
वृक्ष लावणारे, निघोनिया जाती
तळी विसावती, सानथोर ll ४ ll
विचारी गुंतत, हिंडलो बाजारी
पेठेत केवढी, गजबज ll ५ ll
केवढी धांदल, केवढा उल्हास
केवढी आरास, भोवताली ll ६ ll
मात्र एका दारी, दिसे कोणी मात
दीप ओवाळीता, छायाचित्रा ll ७ ll
ओल्या नेत्रकडा हळुच टिपुन
खाली निरांजन, ठेवीत ती ll ८ ll
हुतात्म्याचे घर, सांगे कुणी कान
चित्त थरारोनी, ऐकतसे ll ९ ll
होते लखाखत, पेठेतले दीप
आकाशी अमूप, तारा होत्या ll १० ll
चित्तापुढे माझ्या, एक दीप होता
एक अश्रु होता, माऊलीचा ll ११ ll
— वि. म. कुलकर्णी
मनास बोध (मनाचे श्लोक)
(भुजंगप्रयात)
मना सज्जना, भक्ति-पंथेची जावें ।तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावें ॥
जनीं निंद्य तें सर्व सोडोनि द्यावें ।
जनीं वंद्य तें सर्व-भावे करावें ॥ १ ॥
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ।
पुढे वैखरी राम आधी वदावा ॥
सदाचार हा थोर सांडू नये तो ।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ २ ॥
मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
मना, सर्वथा पाप-बुद्धी नको रे ॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो ।
मना, अंतरी सार-वीचार राहो ॥ ३ ॥
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा ।
मना सत्य संकल्प जीवी धरावा ॥
मना कल्पना ते नको वीषयांची ।
विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ४ ॥
नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू ।
नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥ ५ ॥
मना, श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावें ।
मना, बोलणें नीच सोशीत जावें ॥
स्वयें सर्वदा नम्र-वाचे वदावें ।
मना, सर्व लोकांसि रे नीववावें ॥ ६ ॥
तनू त्यागिता कीर्ति मागे उरावी ।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचेपरी त्वां झिजावें ।
परी अंतरी सज्जना नीववावें ॥ ७ ॥
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे ।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ।
न होता मनासारखे दुःख मोठे ॥ ८ ॥
सदा सर्वदा प्रीति रामी धरावी ।
सुखाची स्वये सांडि जीवी करावी ॥
देहेदुःख ते सूख मानीत जावे ।
विवेके सदा स्वस्वरूपी भरावें ॥ ९ ॥
जगीं सर्वसूखी असा कोण आहे ।
विचारी मना तूंचि शोधोनि पाहे ॥
मना, त्वांचि रे पूर्व-संचीत केले ।
तयासारिखें भोगणे प्राप्त झाले ॥ १० ॥
मना मानसी दुःख आणू नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥
विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी ।
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ॥ ११ ॥
मना सांग पां रावणां काय जाले ।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ॥
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगी ।
बळे लागला काळ हा पाठिलागी ॥ १२ ॥
जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला ।
परी शेवटी काळमूखी निमाला ॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १३ ॥
मना पाहता सत्य हे मृत्युभूमी ।
जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती ।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥ १४ ॥
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।
अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते ।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते॥ १५ ॥
मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते ।
अकस्मात होणार होऊन जाते ॥
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे ।
मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥ १६ ॥
मना राघवेवीण आशा नको रे ।
मना मानवाची नको कीर्ति तू रे ॥
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे ।
तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे ॥ १७ ॥
मना, सर्वथा सत्य सोडूं नको रे ।
मना, सर्वथा मिथ्य मानूं नको रे ॥
मना, सत्य तें सत्य वाचे वदावें ।
मना, मिथ्य तें मिथ्य सोडोनि द्यावें ॥ १८॥
सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं ।
सदा सर्वदा सत्य-वादी, विवेकी ॥
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ १९॥
फुकाचें मुखी बोलतां काय वेंचे ।
दिसंदीस अभ्यंतरीं सर्व सांचे ॥
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।
विचारें तुझा तूंचि शोधून पाहें ॥ २०॥
— समर्थ रामदास
टीप: पाठ्यपुस्तकात फक्त पांचच श्लोक समाविष्ठ आहेत. 'मनोबोधाचे श्लोक' मधील २०५ श्लोकांपैकी अनेक पिढ्या सर्वशृत असलेल्या निवडक २० श्लोकांचा वेचा इथे घेतला आहे.
आला क्षण - गेला क्षण !
गडबड घाई जगात चाले,
आळस डुलक्या देतो, पण
गंभीरपणे घड्याळ बोले—
'आला क्षण – गेला क्षण !'
घड्याळास या नाही घाई,
विसावाहि तो नाही पण,
त्याचे म्हणणे ध्यानी घेई—
'आला क्षण – गेला क्षण !'
कर्तव्या जे तत्पर त्यांचे
दृढ नियमित व्हावयास मन,
घड्याळ बोले अपुल्या वाचे—
'आला क्षण – गेला क्षण !'
कर्तव्याला विमुख आळशी
त्यांच्या हृदयी हाणित घण,
काळ - ऐक ! गातो अपुल्याशी—
'आला क्षण – गेला क्षण !'
लवाजम्याचे हत्ती झुलती
लक्ष त्यांकडे देतो कोण !
मित रव जर हे सावध करिती—
'आला क्षण – गेला क्षण !'
— केशवसुत
आळस डुलक्या देतो, पण
गंभीरपणे घड्याळ बोले—
'आला क्षण – गेला क्षण !'
घड्याळास या नाही घाई,
विसावाहि तो नाही पण,
त्याचे म्हणणे ध्यानी घेई—
'आला क्षण – गेला क्षण !'
कर्तव्या जे तत्पर त्यांचे
दृढ नियमित व्हावयास मन,
घड्याळ बोले अपुल्या वाचे—
'आला क्षण – गेला क्षण !'
कर्तव्याला विमुख आळशी
त्यांच्या हृदयी हाणित घण,
काळ - ऐक ! गातो अपुल्याशी—
'आला क्षण – गेला क्षण !'
लवाजम्याचे हत्ती झुलती
लक्ष त्यांकडे देतो कोण !
मित रव जर हे सावध करिती—
'आला क्षण – गेला क्षण !'
— केशवसुत
29 January 2021
भाताचा हंगाम
देवाजीच्या नांवा घेऊनी
तयार व्हा रे करू कापणी
पहांट होता जाउं चला रे
पचंग बांधुनि तयार व्हा रे
खसाखसा मग विळा चालवा
चूड कापुनि घाला आडवा
चूडावरती चूड ठेवुनी
कडपें बनवा, खपा कसूनी
कापा ! कापा ! झटुनी सारे
कडपांचे मग बांधू भारे
उचलुनि डोकीवर ते घेउं
चला खळ्यावर झप झप जाउं
एकावरती दुसरा चढवा
भार्यांची ह्या उडवी बनवा
सांठवणी हि आज संपली
पुढे झोडणी करणें आली
देवाजीच्या नांवा घेतां
बरकत येते बहुतची भाता
झोडा भारे खळें भरेल
भाताची मग रास पडेल
शाबास तुमची ! भले बहादर !
काम उडवुनी द्याच भराभर
भाताची ही रास पडतसे
माचुंड्यांचा ढीग होतसे
घ्या घ्या आतां हाती सुपाला
वारा वाहे वारवण्याला
पाळींज, कचरा उडुनी जाई
निवळ खालती भातच राही
मोजुनि ते कणग्यांत सांठवा
देवाचे उपकार आठवा
तयार व्हा रे करू कापणी
पहांट होता जाउं चला रे
पचंग बांधुनि तयार व्हा रे
खसाखसा मग विळा चालवा
चूड कापुनि घाला आडवा
चूडावरती चूड ठेवुनी
कडपें बनवा, खपा कसूनी
कापा ! कापा ! झटुनी सारे
कडपांचे मग बांधू भारे
उचलुनि डोकीवर ते घेउं
चला खळ्यावर झप झप जाउं
एकावरती दुसरा चढवा
भार्यांची ह्या उडवी बनवा
सांठवणी हि आज संपली
पुढे झोडणी करणें आली
देवाजीच्या नांवा घेतां
बरकत येते बहुतची भाता
झोडा भारे खळें भरेल
भाताची मग रास पडेल
शाबास तुमची ! भले बहादर !
काम उडवुनी द्याच भराभर
भाताची ही रास पडतसे
माचुंड्यांचा ढीग होतसे
घ्या घ्या आतां हाती सुपाला
वारा वाहे वारवण्याला
पाळींज, कचरा उडुनी जाई
निवळ खालती भातच राही
मोजुनि ते कणग्यांत सांठवा
देवाचे उपकार आठवा
Labels:
अज्ञात,
ग्रामीण कविता,
भाताचा हंगाम
28 January 2021
माहेर
तापीकाठची चिकण माती,
ओटा तरी बांधू गं बाई.असा ओटा चांगला तर,
जातं तरी मांडू गं बाई.असं जातं चांगलं तर,
सोजी तरी दळू गं बाई.अशी सोजी चांगली तर,
लाडू तरी बांधू गं बाई.असे लाडू चांगले तर,
शेल्याच्या पदरी बांधू गं बाई.असा शेला चांगला तर,
भाऊराया भेटू गं बाई.असा भाऊ चांगला तर,
दारी रथ आणील गं बाई.असा रथ चांगला तर,
नंदी तरी जुंपिन गं बाई.असा नंदी चांगला तर,
माहेराला जाऊ गं बाई.असं माहेर चांगलं तर,
धिंगामस्ती करू गं बाई !
- सदाशिव माळी
Labels:
माहेर>,
सदाशिव माळी
Subscribe to:
Posts (Atom)


