A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Showing posts with label मुक्तछंद. Show all posts
Showing posts with label मुक्तछंद. Show all posts

27 September 2014

शब्द

आज माझा प्रत्येक शब्द
आभाळ झालाय
मी सडून होतो— पडून होतो— कुढून होतो
इतक्यांदि अर्थच नव्हता माझ्या शब्दाला

माझा शब्द: एक गोणपाट
कोनाड्यात पडलेले
पडलेच उपयोगी
तर कधीमधी घर पुसायला
किंवा पोचारा

मला ठाऊकच नव्हते शब्दांचे आभाळपण
कारण तुम्ही शब्दांनाच बांधलं दावणीला
कसे सांगू तुम्हांला
शब्दावाचून दिन सुने जाताना
काळजाचे कसे कोळसे झाले ते

कळणार नाही माझ्या बाबांनो
हा तळहातावर जपलेला
पाळण्यात जोजावलेला
साता समिंद्राच्य पल्ल्याडला माझा शब्द—
शब्द नाहीयच तो
लहलहणारा जळजळीत लाव्हा
जर उच्चारलाच नाही तो
तर त्वचेलाही फुटतीत शब्दांचे घुमारे !

आज चौखूर उधळलेला माझा शब्द—
कसे सांगू तुम्हांला,
आज माझा प्रत्येक शब्द आभाळ झालाय !


— अरुण कृष्णाजी कांबळे


(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

26 September 2014

स्पर्शातून

विसरसीमेहून आठवत आठवत येत आहे
मास्तर, तुम्ही जोडलेलं वर्तुळ कुठं आहे ?

अस्ताभोवती माझं पालवताना मन तुमच्या
मास्तर, उभ्याच आहेत रेघा भागाकाराच्या वेशीच्या

तुम्ही एक अधिक एक शिकवलं
मास्तर, मला तुमच्यात मिळवलं
येता जाता ठेच लागायची,
मास्तर, होता तुम्ही वेशीबाहेर
आमचं नालंदा तुमचं घर

हाडांनी सांधलेली तुम्ही एक आकृती होता
माणूस होता, नागरिक होता, स्वच्छ स्वच्छ नीती होता
तुमच्या स्पर्शातून उगवत होती माझी कोवळी फांदी
अजूनही नाही कळत मास्तर, तुम्ही अस्पृश्य कसे होता ?

होताहेत आता मुक्त संवाद आकाश-मातीचे
                 पण नालंदा कुठं आहे ?
मास्तर, तुम्ही जोडलेलं वर्तुळ कुठं आहे ?


— फ. मुं. शिंदे

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

1 May 2014

फिर्याद

लोकहो ! तुमच्या न्यायालयात
मी फिर्याद आणली आहे
तुम्ही तरी मला न्याय द्याल का ?

माझ्या अंगांगावर झिरपतात
अपमानाच्या खोल जखमा
आमची इज्जत लुटली लुटली जात आहे
जातीयतेच्या धर्मांध व्यासपीठावर,
आमचं शील जळत आहे
धर्मग्रंथाच्या पानापानांवर
हजारो द्रौपदींचे वस्त्रहरण होत असता
बंधूंनो, भीष्म-पांडवांसारखे फक्त
खाली मान घालून बसू नका.
आतातरी डोळ्यांवरची पट्टी उघडा
हा पराजित इतिहास बदलण्यासाठी
आव्हान देणारे बलदंड हात तुम्ही तरी द्याल का ?

लोकहो, तुमच्या न्यायालयात
मी फिर्याद आणली आहे
तुम्ही तरी मला न्याय द्याल हा ?
अपमानाची भीक झोळीत टाकणा​र्‍या 
त्या अभद्र भुतकाळाला
या पेटलेल्या वर्तमानाचा सुरुंग लावा.
जळून जाऊ द्या ही शतकांचे दास्य पत्करणारी
लाचार अगतिक मने.
इथला प्रत्येक प्रकाशकिरणाला
अंधाराचाच शाप आहे,
हे आकाशसुद्धा फितूर आहे
त्या काळ्याकुट्ट ढगांना.
ही धरतीसुद्धा सामील आहे
पूर्वनियोजित कारस्थानांना
ही अत्याचारी परंपरा मिटवणारे
जिद्दीने रणांगणावर लढणारे
पराक्रमी सामर्थ्य तुम्ही तरी द्याल का ?
लोकहो तुमच्या न्यायालयात मी फिर्याद आणली आहे
तुम्ही तरी मला न्याय द्याल कां ?

हि माही फिर्याद
आमच्या कर्मठ संस्कृतीवर आहे
जिने आम्हांला बंद कोठडीत कैद केले आहे,
जिने आम्हांला बहिष्कृत आयुष्यांचे दान दिले आहे.
हे जहर मिसळलेलं अशुद्ध जीवन आम्ही नाकारत आहोत.
या क्रूर शापातून मुक्त होण्यासाठी
उज्ज्वल अशी मंगल प्रभात तुम्ही तरी द्याल का ?
लोकहो, तुमच्या न्यायालयात मी फिर्याद आणली आहे
तुम्ही तरी मला न्याय द्याल का ?


— हिरा बनसोडे

(Compiled by : Ms. Mrudula Tambe, Mumbai)

25 April 2014

बापा रे !

बापा रे ! गरीबी भरते या देशात नजरेत
आहे तिला अजूनही स्वतंत्र अस्तित्व रचनेत,
तिचा दिसतो मुक्त अविष्कार
फिरते ती मंद
पाउलं टाकीत या वसाहतीतून.
सारेच येथील आहेत बुडालेले
तिच्या कृपावंत बधीर अंगघोळ साऊल्यांतून !

तिच्या गूढ मेहेरनजरेने
आहे येथे सार्‍यांनाच पांगळं केलेलं.
समोरच्या पहाडातील रानझुडुपासारखं,
आहे सार्‍यांचंच जीवन वाळलेलं.
तुटलेल्या पाण्याच्या प्रवाहात
उभी राहावीत फांद्यांची सरळ बोटं
निळ्या आकाशात
गावीत नक्षत्रांना ऎकू येतील अशी
व्यथेच्या प्रवाहातून वाहत येणारी गाणी !
वाहतात येथे आसवांच्या नद्या
गरम निळ्या पाण्याच्या.
आहे या देशाची कृपा,
निदान आहे त्यांना स्वातंत्र्य आपलेच
दु:ख कुरवाळण्याचं,
रक्तहीन डोळ्यांच्या वाळलेल्या पापण्यांचं
आहे गरिबीनं एक दीर्घ किंकाळी फोडलेली
आहे सबंध धरती देशाची
सत्तेच्या उबदार दुलईत
अजूनही पेंगुळलेली !

आहेत त्यांना आदेश
हात जुळविण्याचे न बोलता,
आहे ना पोट रितं तुमचं ?
ऐका तर—
आदेश एक कतारवाल्यांचे !
भरा पोटात काठोकाठ—
राष्ट्रप्रेम,
ओसंडू द्या हृदयाच्या बाहेर त्याचे थेंब !
व्हा देशप्रेमात भिजून चिंब आणि
जुळवा आता आपले
वाळलेल्या निष्पर्ण फांद्यांचे हात सायंकाळी
फडफडणार्‍या या ध्वजासमोर


— गजमल माळी

(संकलन : मृदुला तांबे, मुंबई)

19 April 2014

शासन

कोणाला शंका असेल
पण मला निश्चित माहीत आहे,
की माझे नाते
नऊ नक्षत्रांच्या मध्यावर
त्यांना आधार
आणि प्रकाश देत असलेल्या
त्या वैश्विक जाळाशी,
सूर्याशी
आहे
पण केव्हा अंधारल्या घडीला
मीही विसरतो हे नाते
आणि उकिरड्याच्या कडेला बसलेल्या
भिका​​र्‍याप्रमाणे
मी हातात कटोरा घेऊन बसतो
लज्जास्पद,
येत्याजात्या पांथस्थाच्या
अनुदानासाठी.
एखाद्या शेवाळलेल्या क्षणाला
मीही विसरतो ते नाते
आणि भुताटकी वाड्यातील
अमावास्या पीत बसलेल्या
विहिरीप्रमाणे
उबवीत बसतो अंत:करणात
द्वेषमत्सराच्या हिरव्या सर्पाची
चिकट लगदाळी.
एखाद्या विसकटलेल्या दिवशी
मीही विसरतो ते नाते
आणि माझ्या अंगावर ओघळणा​​र्‍या
हलकटपणावर मात करण्यासाठी
होतो इतका हलकट
इतका
की माझ्या मुखावर चढतो
मी कधीही न मागितलेला
एक भयाण विद्रूप
दिर्गंधी मुखवटा.
पण हे सारे सूर्यद्रोह
मी करीत असताना, केल्यावर,
माझ्या काळजाच्या आंतरदेशात
धगधगून
पेटून उठते एक विराट जंगल,
आणि प्रकाश न देणा​​र्‍या
भाजून काढते मला
नि:संगपणाने.
आणि त्याने दिलेले आश्वासनही.


कुसुमाग्रज