A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

22 October 2011

नदी आणि कवी

[उपजाति]

असो कवीचें कुल अप्रसिद्ध
होई कवीच्या कवनें प्रसिद्ध
तसा नदीच्या उगमस्थलाला
नदीमुळे गौरवलाभ झाला II१II

काव्यें कवीचीं जगतांत गावी;
त्यांचे न त्यांच्या परि चोज गांवीं.
नदी सुदूरुस्थ जनां पवित्र
विटाळिती तीर्थ तिचेच पुत्र II२II

बाल्यात उच्छॄंखलवृत्ति दोन्ही
ठावा नसे आडथळा म्हणोनी;
लागो दरी खोल, उभा पहाड,
जातात तीं धांवत धाड धाड ! II३II

जाई जसे अंतर होत खोल
गांभीर्य ये वृत्ति निवे विलोल.
रेखून मार्ग क्रमितात संथ
करीत कल्याण जगी अनंत II४II

अभंग त्यांच्या हृदयीं तरंग
नी:संग ते त्यांत सदैव दंग,
गाऊन गाणीं भ्रमतात रानीं,
ते धन्य ज्यांच्या पडतात कानीं II५II

स्वजीवनानें उगवून दाणे,
नदी जिवां दे चिर जीवदानें.
तैसें कवीच्या कविताप्रवाहें
जीवांत संजीवन दिव्य लाहे II६II

राष्ट्रे बुडालीं नृप थोर गेले;
नदी कवी मात्र अनंत ठेले !
भागीरथीला खळ लेश नाही
अखंड रामायण लोक गाई II७II

महाकवी थोर नदाप्रमाणें;
मी बापडा ओघळ अल्प जाणें.
धाकें न ओढा झुळझूळ वाहे
माझी तशी ही गुणगूण आहे ! II८II


— विनायक

(श्री. श्रीकृष्ण जोशी यांच्या मदतीने)

4 comments:

sunil pandit said...

hi air i like to reads marathi kavita mala 4 th madhil amrataru hi kavvita pathavata ali tar chan hoihil
amrataru ha dari shiravar poremal nij sahuli

Anonymous said...

hi kavita 'Vinayak' (Vinayak Janardan Karandikar) yanchi aahe. - Shrikant Dhundiraj Joshi

Nandkishor J. Muley, said...

नदी आणि कवीचं इतकं समर्पक साम्य वर्णन "विनायका" शिवाय शक्य नाही. म्हणून म्हणतात ना जे ना देखे ते देखे कवी !! ... नं.ज.मुळे

Jeevanlal said...

माझ्या एका बालमित्राला शाळेतल्या या कवितेतील, आठवणीत राहिल्या त्या, पुढील ओळी उदाहरणादाखल मागच्या आठवड्यात ऐकवल्या: काव्ये कवीची जगतात गावी, त्याचे न त्याच्या परि चोज गांवी,..... नदी सुदुरुस्थ जना पवित्र, विटाळती तीर्थ तिचेच पुत्र. (हे आमचे मित्र प्रसिद्ध वकील असून गुणी आहेत. आमचे वय वाढत गेले तसे त्यांच्यातले गुण जास्त जास्त जाणवत गेले. वरील ओळींचे उदाहरण घेऊन त्यांच्या स्वभावातील गुण त्यांना सांगायचे होते. मात्र त्यावर त्यांनी, गमतीने प्रतिसाद दिला की घरी तर त्यांना सर्वसाधारण व्यक्ती एवढंच महत्त्व असते. वरील ओळी त्यांना ऐकवाव्या लागल्या. आपल्या ब्लॉगमध्ये, आम्हाला शाळेत होती ती कविता पाहून आनंद झाला. धन्यवाद.... मराठीत धन्यवाद म्हणायची पद्धत नाही, म्हटले तर ते वरवरचे वाटते, किंवा असे म्हणणारी व्यक्ती काहीतरी खोटे बोलते असं वाटतं आहे,🙊😂)