A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

14 December 2012

शेवटचा लाडू

सुटी संपली नी चाललों गांवाहुन दूर;
आणिक तव नयनीं लोटला अश्रुंचा पूर.
ताप जरी होता तरी पण जागुनियां रात्रीं
मी निजतां करिशी तयारी मजसाठी सारी;
आणिक हे लाडू तुला मी 'नको, नको' म्हणतां,
नकळत मज भरिशी डब्यांतुन तो भरतां भरतां ll १ll

तेच तुझे लाडू सुखानें मी पुरवुन खातां,
आज उरे मागें तयांतिल आवडता सरता.
वाटतसे घाई कशाला मी इतकी केली ?
नाहीं तर असते अधिकसे उरले या वेळीं.
खाऊ नये वाटे तरी पण शिरतो तोंडात,
आणिक मज भासे तुझा हा भरवितसे हात.
तूं असशी जवळीं दूर ना दूर कोंकणांत;
तूं भरवित असशी तुझ्या मी बसलों ताटांत ll२ll

छे, चुकलें, गेलें; संपला शिल्लक जो होता.
छे, चुकलें, आतां भास ना प्रेमळ तो पुढता.
उजाडेल उद्यां आणखी माधुकरी आली;
उजाडेल उद्यां आणखी वारावर पाळी.
उजाडेल उद्यां आणखी भूक मला खाई;
उजाडेल उद्यां आणखी लाडू मज नाहीं
मिळेल जो मजला उद्यां, तो मी गिळणें घांस
मिळेल ना कोठें असा हा, आई, तव भास ! ll३ll


– विंदा करंदीकर

15 comments:

Unknown said...

काही वर्षांपुर्वी मी या कवितेचा शोध घेत होतो पण तेंव्हा ती internet वर उपलब्ध नव्हती, आज अचानक आठवण झाली आणी पाहिली तर दरम्यानच्या काळात कोणीतरी ती केली असावी. As someone who left home at the age of 17 for higher education and never really went back for any extended period of time, this poem has - and will continue to have - a special place in my heart. आज इतक्या वर्षांनी ही कविता पूर्ण रूपात वाचताना, या कवितेचा आईला hostel मधून लिहीलेल्या पत्रातला उल्लेख आठवला आणि नकळत डोळे भरून आले.

Suresh Shirodkar said...

Sudhir Oak said...

काही वर्षांपुर्वी मी "शेवटचा लाडू" या कवितेचा शोध घेत होतो पण तेंव्हा ती internet वर उपलब्ध नव्हती, आज अचानक आठवण झाली आणी पाहिली तर दरम्यानच्या काळात ती इथे upload झाली होती. As someone who left home at the age of 17 for higher education and never really went back for good, this poem always had a special place in my heart. I had referred to this poem in my letter to my parents when the लाडूचा डबा my mom gave me to take with was about to finish. Reading it after all those years, was both emotionally rewarding and challenging, it was tough the hold back the moisture wanting to come out of the eyes!!! You just made my day.

Unknown said...

मी ही कविता शोधत hote. अचानक milali. खूप भाऊक कविता ahe. आजही वाचताना डोळ्यात पाणी येते . सुधा कुलकर्णी

Unknown said...

मी खूप दिवस ही कविता शोधत होते.आज सापडली आम्हाला ई.5ला होती आता वाचून खूप आनंद झाला. खूप धन्यवाद

Unknown said...

फार ह्रदयस्पर्शी कवीता

Unknown said...

माझी आवडती कविता.

सुरेश पाटील said...

सापडली एकदाची

Unknown said...

आज 75 व्या वर्षी मी ही कविता आठवत होतो. पण पहिल्या दोन ओळीच्या पुढे काहीही येत नव्हते. 65 वर्षांनी वाचायला मिळाली. बरे वाटले.

Unknown said...

शेवटचा लाडु... इयत्ता ५ वी मधील कविता वाचुन बालपणाची आठवण आली..!!

Unknown said...

कविता सापडली आणि शाळेच्या वर्गातले दिवस आठवले. त्यावेळी सुद्धा ही कविता वाचताना डोळ्यात पाणी यायचे. माझे वडील 3 री पास झाल्यावर 4थी पासून मुंबईत श्री बापट यांचे घरी आले. त्यांच्या घरातील पडतील ती कामं करून रोज एका घरी वारावर जेवायला जात. त्यांनी दिलेल्या वह्या, पुस्तक घेऊन अभ्यास केला. मॅट्रिक ला त्या काळी सर्व विषयात distinction मिळवले. प्रमोद आपटे.

Unknown said...

Wow sir

केदार पांडुरंग पेंढरकर said...

आणखी एक कविता होती , त्याच्या 2/3 ओळीच मला आठवतात , कोणालाही ही कविता माहिती असेल तर / मिळाली तर नक्कीच मला पाठवा ही विनंती 🙏🙏🙏

ह्या त्या ओळी ,

खुजबुज, खुजबुज, खुजबुज, खुजबुज रे
चंदनाच्या झाडाखाली पानं का वाजे
चंदनाच्या झाडाखाली आल्या सावल्या
दिवसाच्या उन्हाने त्या होत्या कावल्या
नका धावू , नका पळू जमा जमा हळूहळू
हरणांनो ,पाडसांनो कोंडीत शिरा
.........

.........

राणी चिंचकर said...

माझी आई ही कविता फार आवडीने म्हणायची. तिच्या आवाजातील रेकॉर्ड नाही करू शकलेअसं वाटल की तिच्याबरोबर गेली ही कविता पण खूप आभार मला ती मिळाली. खूप खूप धन्यवाद

Unknown said...

1964-65 ला अभ्यासाला होती.अजूनही बरीचशी पाठ आहे.3-4 वर्ष शोधत होतो.नातवंडांना ऐकवायची होती.अजूनही भरून येते.

Dilip Deshpande said...

खूप दिवस झाले शेवटचा लाडूही कविता आठवत होती,आज मी ७४ व चा आहे. ही कविता नेट वर उपलब्द केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
बऱ्याच वेळा वाटते की आपल्या वेळच्या कविता आणि जुनी गाणी काळाच्या उदरात नाहीश्या होणार का पण अश्या स्तुत्य उपक्रमामुळे त्या जिवंत राहतील,
असाच एक श्लोक माझे वडील सांगायचे , जर कोणाला ती माहिती असेल तर सांगा, त्याच्या ओळी अश्या आहेत, ती प्रभू रामचंद्रांची आहे
सूर्य वंशी राघवे शी(नि) हा तुरंग सोडीला,
ह्यासी जो धरील तो नृपात वीर आगळा,
सैन्य हे करील युद्ध .....


दिलीप देशपांडे