(एके दिवशी संध्याकाळी नर्मदातटावर कांही मुली दिवे सोडीत होत्या; तो प्रसंग स्मरून हि कविता लिहीली होती.)
करीं आरती घेउनी आर्यबाला
त्वरें पातल्या नर्मदेच्या तटाला;
करूनी तयांनीं सरित्पूजनाला
प्रवाहीं दिली सोडुनी दीपमाला. ।।१।।
अहा काय शोभा वदूं त्या क्षणाची
तृषा शांत झाली मदीयेक्षणांची;
तदा अस्तगामी जरी अंशुमाली
मना वाटलें यामिनी काय झाली. ।।२।।
सरित्पात्र तें स्वच्छ तैसें विशाल
तदा भासलें कीं दुजें अंतराल;
तती त्यावरी शोभली दीपिकांची
उदेली जणों पंक्ति कीं तारकांची. ।।३।।
जशी अंतरिक्षी फिरे चंद्रकोर
प्रवाहीं करी रम्य नौकाविहार;
नभीं स्वैर संचारती मेघखंड
जलीं खेळती वीचि तैशा उदंड. ।।४।।
अशी दिव्य शोभा पहातां पहातां
मनी शांत झालों, लया जाय चिंता;
झणी सूचली कल्पना एक चित्ता
असे सर्व सृष्टीस जी मूलभूता. ।।५।।
दिले सोडूनी दीप जें बालिकांनीं
दिला सारिखा वेग सर्वां तयांनीं
तयांची स्थिती तत्क्षणी भिन्न झाली
वरी दृष्य कोणी, कुणी जाय खालीं. ।।६।।
कुणी गुंतुनी राहिले भोवर्यात
जलौघासवें जाय कोणी वहात;
तयांतील काही तटा अन्य गेले
पुढें जाउनी अल्प मागेंचि आले. ।।७।।
जसे दीप तैसे असंख्यात जीव
प्रभू निर्मितो, थोर ज्याचा प्रभाव;
तयां सोडुनी देत काल-प्रवाहीं
वहाती तदौघासवें सर्व देही. ।।८।।
कुणी रंक होई, कुणी होय राजा
दुजा देखणा हो, तिजा हीनतेजा;
कुणी मूर्ख होई, कुणी हो शहाणा
कुणी धैर्यशाली, तसा भ्याड जाणा. ।।९।।
"तसे कां करावें ?" "असें मी करींन"
वृथा वल्गना मानवांच्या अजाण;
स्थितीचा असे किंकर प्राणिमात्र
स्थिती त्या करी पात्र किंवा अपात्र. ।।१०।।
जरी राहिलें नर्मदातीर दूर
जरी आज बाला न दृष्टीसमोर;
स्मरोनी तरी दीपसर्गप्रसंग
झणी हर्षयोगें भरे अंतरंग. ।।११।।
— माधवानुज (डॉ. काशिनाथ हरी मोडक)
करीं आरती घेउनी आर्यबाला
त्वरें पातल्या नर्मदेच्या तटाला;
करूनी तयांनीं सरित्पूजनाला
प्रवाहीं दिली सोडुनी दीपमाला. ।।१।।
अहा काय शोभा वदूं त्या क्षणाची
तृषा शांत झाली मदीयेक्षणांची;
तदा अस्तगामी जरी अंशुमाली
मना वाटलें यामिनी काय झाली. ।।२।।
सरित्पात्र तें स्वच्छ तैसें विशाल
तदा भासलें कीं दुजें अंतराल;
तती त्यावरी शोभली दीपिकांची
उदेली जणों पंक्ति कीं तारकांची. ।।३।।
जशी अंतरिक्षी फिरे चंद्रकोर
प्रवाहीं करी रम्य नौकाविहार;
नभीं स्वैर संचारती मेघखंड
जलीं खेळती वीचि तैशा उदंड. ।।४।।
अशी दिव्य शोभा पहातां पहातां
मनी शांत झालों, लया जाय चिंता;
झणी सूचली कल्पना एक चित्ता
असे सर्व सृष्टीस जी मूलभूता. ।।५।।
दिले सोडूनी दीप जें बालिकांनीं
दिला सारिखा वेग सर्वां तयांनीं
तयांची स्थिती तत्क्षणी भिन्न झाली
वरी दृष्य कोणी, कुणी जाय खालीं. ।।६।।
कुणी गुंतुनी राहिले भोवर्यात
जलौघासवें जाय कोणी वहात;
तयांतील काही तटा अन्य गेले
पुढें जाउनी अल्प मागेंचि आले. ।।७।।
जसे दीप तैसे असंख्यात जीव
प्रभू निर्मितो, थोर ज्याचा प्रभाव;
तयां सोडुनी देत काल-प्रवाहीं
वहाती तदौघासवें सर्व देही. ।।८।।
कुणी रंक होई, कुणी होय राजा
दुजा देखणा हो, तिजा हीनतेजा;
कुणी मूर्ख होई, कुणी हो शहाणा
कुणी धैर्यशाली, तसा भ्याड जाणा. ।।९।।
"तसे कां करावें ?" "असें मी करींन"
वृथा वल्गना मानवांच्या अजाण;
स्थितीचा असे किंकर प्राणिमात्र
स्थिती त्या करी पात्र किंवा अपात्र. ।।१०।।
जरी राहिलें नर्मदातीर दूर
जरी आज बाला न दृष्टीसमोर;
स्मरोनी तरी दीपसर्गप्रसंग
झणी हर्षयोगें भरे अंतरंग. ।।११।।
— माधवानुज (डॉ. काशिनाथ हरी मोडक)
No comments:
Post a Comment