रम्य ते बालपण!
'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.
साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!
सुचना:
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.
येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.
ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.
कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! - सुरेश शिरोडकर (संग्राहक)balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
5 comments:
आपला हा ब्लॉग अतिशय सुंदर आहे. बालपणीच्या कितीतरी विसरलेल्या, अर्धवट आठवणार्या आणि आता आठवण्याचा प्रयत्न करीत असलेल्या कविता इथे मला सापडल्या; अणि खूप आनंद झाला. त्याबद्दल आपले अभिनंदन व आभार.
वरील कवितेत माझ्या आठवणीप्रमाणे मधे व शेवटी आणखी दोन कडवी आहेत ती आपण दिलेल्या शेवटच्या कडव्यातील काही सुधारणांसह नम्रपणे सुचवू इच्छितो. आपण राग मानणार नाही अशी आशा आहे.
पराग पिवळे झगमगती या ऒळीनंतर
तळी पुन्हा अन गोजिरवाणी
लाल पाकळी फुलते रे,
उन्हामधे हे रंग पाहता
भान हरपुनी गेले रे.
पहाटवेळी आभाळ येते
लहान होउनि तुझ्याहुनी
तुला भरविते निळ्य़ा करांनी
दवमोत्यांची कणी कणी.
मलाहि वाटे लहान व्हावे
तुझ्याहूनही लहान रे,
तुझ्या संगती सदा रहावे
विसरुनि शाळा घर सारे.
तुझी गोजिरी शिकून भाषा
गोष्टी तुजला सांगाव्या,
तुझे शिकावे खेळ आणखी
जादू तुजला शिकवाव्या.
आभाळाशी हट्ट करावा
खाऊ खावा तुझ्यासवे,
तुझे घालुनी रंगित कपडे
फूलपाखरा फसवावे.
मृग या कवितेमध्ये शेवटचे एक कडवे आपण घातलेले नाही. मला आठवते ते असे.
गावानेच उंच केला
हात दैवी प्रसादास
भिजूनिया चिंब झाला
गावदेवीचा कळस.
मला खात्री नाही पण मला असे वाटते की ही कविता गदिमांची नसून व्यंकटेश माडगूळकर यांची असावी.कृपया तपासून पहावे.
@ Unmesh Inamdar,
"गवतफुला" या कवितेत चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या सारख्या दर्दी आणि जागरुक वाचकांची केवळ याच ब्लोगला नव्हे तर अखंड "मराठी कवितेला" नितांत गरज आहे; त्यामुळे राग मानून घ्यायचा प्रश्नच येत नाही.
कृपया इंदिरा संत यांची
तुझ्या घराला वाट जातसे पांधी पांधी तुन या
कवितेचा समावेश करावा।अपल्स ब्लॉग हा अनमोल ठेवा आहे।शतशः धन्यवाद।खूप चांगली कल्पना।
Post a Comment