A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

5 December 2021

झप-झप चाललेत नाजुक पाय

मे महिन्याची दुपार ... रणरणते उन्ह
झगमगता सूर्य आभाळामधून
जाई फुलासारखी नाजुक पोर
घेउन निघाली बापाला भाकर
गिरणीचा भोंगा आत्ता होईल
दमलेला बाप फाटकात येईल
उशिर झाला म्हणून रागवेल काय ?
झप-झप चाललेत नाजुक पाय.

घरचे सगळेच तिनेच केले
आजारी आईला औषध दिले
धाकट्या भावाची घेतली शिकवणी
पाठच्या बहिणीची घातली वेणी
येईल तसा शिजवला भात
तापलेल्या तव्याने पोळले हात
तरीपण डोळ्यात पाणी नाही
आईचीच आज ती होती आई
डोळे भरुन पाहत होती माय
झप-झप चाललेत नाजुक पाय.

माथ्यावर उन्ह ... पायाखाली उन्ह
परिस्थितीचे मनात उन्ह
निखार्‍यात तापलेल्या धरणीमाये
पोरीचे पाऊल कमळाचे आहे
तिच्या पावलाखाली चंदन हो
माथ्यावरच्या सूर्या चंद्रमा हो
अरे, तिच्या डोळ्यातली भिती पाहा
ड्याळा थोडेसे मागे रहा
बापासाठी लेक ओढीने जाय
झप-झप चाललेत नाजुक पाय !



— दत्ता हलसगीकर

संकल्पना : श्रीयुत दिनेश कासवेद, पुणे.

19 comments:

Gouri said...

आज प्रथमच वाचली ही कविता, आणि फार आवडली!

Unknown said...

very nice
khup sundar ..shalet astana vachali hoti ...aata aathvali ..dhanywad

Purushottam said...

अतिशय सुंदर कविता👍

Unknown said...

काही जुने पाठ ही आहेत ते ही ऊपल्ध करावेत, युवक भारती 1999
धन्यवाद

Unknown said...

अप्रतिम कविता आहे.आम्हाला ही कविता होती पण नेमका वर्ग आठवत नाही.सर्व वर्ग रडला होता.कवितेच्या शब्दांनी आणि गुरुजींच्या शिकवन्याने

Ashwini Mehta said...

हृदयाला भिडणारी कविता
काही गावात अजूनही लहान मुलींवर एवढी मोठी जबाबदारी पडते..
अनेक वर्षानी ही कविता वाचली...शाळेचे दिवस आठवले

Unknown said...

1994मध्ये मी चौथीला असतांना ही छान कविता होती.
अजूनही तो दिवस आठवतो त्या दिवशी सरांनी ही कविता
शिकवली.धन्यवाद सर..

Maharaja said...

आज ही कविता मनात ताजी आहे.....खूप छान

Unknown said...

मनाला भिडणारी खूपच सुंदर कविता

Amit Jadhav said...

खूपच छान कविता आहे ही 👌👌
किती दिवसांनी वाचली पण खरच आज ही कविता मनात ताजी आहे.
Thank you.

Unknown said...

मी चौथीला असतांना ही छान कविता होती.
अजूनही तो दिवस आठवतो ज्या दिवशी ही कविता
शिकवली.

asmita said...

मी अशी वाचलेली...

मे महिन्याची दुपार ... रणरणते ऊन ... झगमगता सुर्य आभाळामधून ...
बाकी same

Unknown said...

छान कविता आहे , लहान बहिणीच्या अभ्यासक्रम मध्ये हो तेंव्हा खुप आवडली आणि पाठ सुध्दा झाली , आज सहज आठवली परंतु पूर्ण आठवेना म्हणून सर्च केली आणि सापडली छान वाटले

Deepa Borkar Mane said...

मी ही कविता शिकवलीय. इयत्ता पाचवीला.विद्यार्थ्यांना प्रचंड आवडायची ही कविता.
परंतु मला सुरुवात आठवते ती अशी

मे महिन्याची दुपार
रणरणत उन्ह
झगमगता सूर्य आभाळामधून

सौ.गीतांजली योगेश गवळी said...

आज त्याहीपेक्षा कडक उन्हाळा असतो,कूठेतरी कूणीतरी पोर आजारी आईसाठी धडपडत असेल ,तेच कमळाचे पाय कूठेतरी रस्त्यावरच्या दगडफोडीसाठी ,ऊसतोडीसाठी भाजत असतील,गिरणीचा भोंगा कूठे राहीला नाही पण कूणा बिगारीच्या परीस्थीतीचा वाजलेला भोंगा आजही आकंठ घोंगावतच आहे हिच आणी काहीशी अशीच गरिबीची झळ आजही वस्त्यामधे रणरणत आहे ..हे सगळं तेव्हाही तसच होतं आजही तसंच आहे..श्रीमंत श्रीमंतच होत राहीले आणी गरीबांची गरीबी पीढीजातच राहीली..तेव्हा ऐन ऊन्त्राळ्याच्या झळ्यांमधे ही कवीता शिकताना आमच्या आगाशे बाईंनी एवढी सूंदर प्रस्तावना केली होती कि,वर्गात नूसते हूंदके फूसफूसण्याचे आवाज येत होते..सतत एकांतात कवीता वाचून वाचून आजही ती तोंडपाठच आहे..खरच ती गरीब मूलगी कोण असावी बरं याची उत्सूकता हौती,तीला मदत करावीशी वाटायचे,कवीतेला भावना असतात हे पटायला लागायच्या वयाच्या आधीच मनात घर करून या कवीतेतले भाव...अप्रतीम सत्य परीस्थीती दत्ता हलसगीकर सरांनी मांडलीय..करावे तेवढे कौतूक कमीच असेल..!!!!

Unknown said...

खुपच सुंदर कविता आहे. शाळेत असताना वाचली होती.परत ती वाचायला मिळाली आणि शाळेतल्या दिवसाची आठवण झाली. धन्यवाद

Unknown said...

मला लहानपणी शाळेत असताना बालभारती पुस्तकात ही कविता होती.तोंडपाठ होती.छान कविता. परिस्थितीचे वास्तवदर्शी चित्रण.खूप छान आवडती कविता.

Nilesh said...

Very nice...

YouFestive said...

Nice article along with poems Visit YouFestive Our Culture India Many thanks.