A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

14 December 2011

केकावली (निवडक)

(पृथ्वी)

पिता जरि विटे, विटो; न जननी कुपुत्री विटे;
दयामृतरसार्द्रधी न कुलकज्जले त्या किटे;
प्रसादपट झांकिती परि परा गुरूंचे थिटे;
म्हणूनि म्हणती भले, न ऋण जन्मदेचें फिटे ॥ २२ ॥

तुम्ही बहु भले, मला उमज होय ऐसे कथा;
कसा रसिक तो, पुन्हा जरि म्हणेल आली कथा
प्रतिक्षण नवीच दे रुचि शुकाहि संन्यासिया;
न मोहिति भवत्कथा अरसिका अधन्यासि या ॥ २३ ॥

तुझें यशचि तारितें परि न केवला तारवे;
सहाय असिला असे, तरिच शत्रूला मारवे;
न भागवत भेटतां, न घडतांहि सत्संगती
न अज्ञहृदयें तशीं तव यशोरसी रंगती ॥ २४ ॥

सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो
कळंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो,
सदन्घ्रिकमळी दडो; मुरडिता हटानें अडो
वियोग घडता रडो; मन भवच्चरित्री जडो ॥ २५ ॥

न निश्चय कधी ढळो; कुजनिविघ्नबाधा टळो,
न चित्त भजती चळो; मति सदुक्तमार्गी वळो,
स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो,
पुन्हा न मन हें मळो; दुरित आत्मबोधें जळो ॥ २६ ॥

मुखी हरि ! वसो तुझी कुशळधामनामावली,
क्षणांत पुरवील ती सकल कामना, मावली;
कृपा करिसि तू जगत्सयनिवास दासांवरी,
तसी प्रकट हे नीजश्रितजनां सदा सांवरी ॥ २७ ॥

दयामृतघना ! अहो ! हरि ! वळा मयूराकडे,
रडे शिशु, तयासि घे कळवळोनि माता कडे
असा अतिथि धार्मिकस्तुतपदा ! कदा सांपडे ?
तुम्हां जड भवार्णवी उतरितां न दासां पडे ॥ २८ ॥



— मोरोपंत (मोरेश्वर रामचंद्र पराडकर)

वास्तविक केकावलीमध्ये जवळ जवळ १२२ श्लोक आहेत, त्यातील काही निवडक इथे देण्यात आले आहेत.

7 comments:

blank_verse16 said...

cant copy paste

Suresh Shirodkar said...

Copy pest is not allowed but if you want any poem it can be mailed to you.

सुनिल said...

1978 ते 1983 या काळातील बालभारती आणि कुमारभारती पुस्तके कुठे मिळतील का

Unknown said...

माझ्या ई-मेल वर वरील केकावली पाठवा. arvindbordekar96938@gmail. com

विश्वास देशपांडे, डोंबिवली said...

Google वर ebalbharti या नावाने search करा.Home page वर पहिले मराठी select करुन नंतर इयत्ता व वर्ष select करा. बरीचशी पुस्तकं उपलब्ध आहेत.

Unknown said...

मला माझ्या आईसाठी
'कुजबूज कुजबुज कुजबुज कुजबुज
कुजबुज कुजबुज कुजबुज कुजबुज रे

पारध्याला हिव आले आज न दगा'
ही कविता हवी आहे. कृपया पाठवाल का?
- डॉ निलेश महामुनी
ई-मेल: nileshmahamunida@gmail.com

Unknown said...

आटपाट नगरात नांदे राजाची ग राणी
नवा तिचे मैना राणी
ही खूप जुनी कविता कोणाकडे असेल तर कृपया पाठवा