A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

22 October 2011

माधुकरी

गरिब बिचारा माधुकरी, दु:ख तयाला जन्मभरी ll ध्रु. ll

कडक उन्हानें जीव घाबरे, कपोल सुकले घर्मे भिजले
पायी चटके; तापे डोके, धांपा टाकीत पळे जरी ll१ ll

बुरबुर लागे पाऊसधारा, चिखल माखला अंगी सारा
घट्ट तपेली, झोळी धरिली, धांवत जातो घरोघरी ll २ ll

भणभण झोंबे वारा अंगा, बधीर गात्रें पायीं भेगा
हात कांपती, दांत वाजती, कुडकुडतो हा घडी घडी ll ३ ll

विटक्या अपुर्‍या मुकट्यावांचुनी, वस्त्र दुपारी अंगी कोठुनि
हि धार्मिकता लोकांकरितां, नित्य सोशितो कष्ट जरी ll ४ ll

सण आनंदी घरोघरी जरि, नित्य कपाळी सुटे न वारी
शिळी बुरसली, खवट आंबली, अशीच नशिबी सदा भाकरी ll ५ ll

'उशीर' कोठे कुठें 'संपले' मिळे कालवण भाग्य उदेले
नांवा धरिली करी तपेली, अश्रू तोंडी, घांस गिळी ll ६ ll

झोळी थोडिहि अजुनि न भरली, शाळेची तर घंटा झाली
मुख हिरमुसले, घांस कोंबले; दप्तर घेउनि पळे जरी ll ७ ll

शिळे त्यांतले रात्रीकरितां, निजे उपाशी अपुरे पडतां
कुणा कळवळा येई बोला, दु:ख तयाचे अणूपरी ll ८ ll

नंबर गेला एक खालती, जाईल नादारी ही भीती
सांजसकाळी अभ्यासच करि, फुरसत खेळा कुठे तरी ll ९ ll

गोसावी, भट, धन्य भिकारी, तेलंग्याचे भाग्य कितीतरि
पैसा दूरच, पुस्तक धोतर, जुने द्यावया नसे घरी ll १० ll

निजे कुणाच्या ओटीवरती, अर्धे धोतर खाली वरती
एकच सदरा तोच उशाला; दया न येते जगा परी ll ११ ll

यजमानाला पलंग गिरदी, आंत उकडते खुपते गादी
पोटी धरुनी पाय जुळवुनी, कुडकुडतो हा रात्रभरी ll १२ ll

पुण्यांत आला अभ्यासाला, पदोपदी जग अडवी त्याला
विद्या करितो, हाल सोशितो, शूर नव्हे का खरोखरी
गरिब बिचारा माधुकरी? ll १३ ll


- श्रीधर बाळकृष्ण रानडे

5 comments:

amoul said...

ashi dukhkh aathavli tarach aaplya sukhkhnci kimmat kalate... thanks for post......

Anonymous said...

Sir...very nice to read...i remmember my father ...sir on which period same poet was in syllabus...

Unknown said...

ह्या कवितेतून मला साने गुरुजींच्या आठवणी जाग्या झाल्या.
अत्यंत गरिबीत किंबहुना माधुकरी मागून ह्या याचकाने आपले शिक्षण पूर्ण केले, आणि भारत मातेच्या गरीब आणि असहाय जनतेला ह्या दुःख, दारिद्य आणि संकटापासून मुक्त होण्यासाठी अहोरात्र जीवाचे रान केले,
पण नियतीला हे मान्य नव्हते, राजकारण्यांनी त्यांचा घात केला
😢😢😢😢

Unknown said...

हे अगदी खरंच आहे
💐💐

Unknown said...

Kavita Vachun mala majhya aai chi aathavan aali mi lahan aastana majhi aai swayampak kartana hi Kavita nehamich manayachi ticha sobat mala pan pathanatar jhali hoti. mala majhya balpanachi athavan tajhi jhali
Far Kahi shiknya joga aahe.