'ओळखलंत का सर मला' – पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून :
'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून;
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी – बायको मात्र वाचली–
भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले –
कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे' –
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
'पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला–
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. '
– कुसुमाग्रज
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून :
'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून;
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी – बायको मात्र वाचली–
भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले –
कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे' –
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
'पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला–
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. '
– कुसुमाग्रज
3 comments:
माझी खुप आवडती कविता आहें
नायक जे मागतो
"पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा "
आयुश्यात अशी लढ म्हणनार्यां माणसांची खरच खुप गरज असते आपल्याला
ही कविता वाचून नेहमीच प्रेरणा मिळते. आणि ज्यांनी आयुष्यातील या वाटचालीत असा पाठीवर हात ठेवला आहे, त्यांच्याप्रतीची कृतज्ञता दाटुन येते.
Great Lines
Post a Comment