A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

2 December 2009

श्रावणमास


'बालभारती - आठवणीतील कविता' म्हटले की, सर्वात पहीली कुठली कविता आठवत असेल तर ती 'श्रावणमासीं हर्ष मानसीं' या कवितेची नुसती आठवण जरी झाली तरी लगेच आपण त्यातल्या ओळी गुणगुणायला लागतो. "बालभारती - मराठी कविता" या माझ्या नवीन ब्लॉगची सुरुवात बालकवींच्या याच 'श्रावणमास' कवितेने करतो.

- सुरेश शिरोडकर
(संकलक)



श्रावणमास

श्रावणमासीं हर्ष मानसीं हिरवळ दाटें चोहिंकडे;
क्षणांत येतें सरसर शिरवें, क्षणांत फिरुनि ऊन पडे ll १ ll

वरतीं बघतां इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण काय बांधिलें नभोमंडपी कुणि भासे ! ll २ ll

झालासा सुर्यास्त वाटतो, सांज अहाहा ! तों उघडे,
तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळेंपिवळें ऊन पडे ll ३ ll

उठती वरतीं जलदांवरतीं अनंत संध्याराग पहा;
सर्व नभावर होय रेखिलें सुंदरतेचे रुप महा ll ४ ll

बलाकमाला उडतां भासे कल्पसुमांचि माळचि ते,
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि कीं एकमतें ll ५ ll

फडफड करुनी भिजले अपुले पंख पांखरें सांवरिती; 
सुंदर हरिणी हिरव्या कुरणीं निजबाळांसह बागडती ll ६ ll

खिल्लारें हीं चरती रानीं, गोपहि गाणी गात फिरे,
मंजुळ पावा गात तयाचा श्रावणमहिमा एकसुरें ll ७ ll

सुवर्णचंपक फुलला, विपिनीं रम्य केवडा दरवळला,
पारिजातही बघतां भामा, रोष मनींचा मावळला ! ll ८ ll

सुंदर परडी घेउनि हातीं पुरोपकंठी शुध्दमती,
सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुलें-पत्री खुडतीं ll ९ ll

देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयांत,
वदनीं त्यांच्या वाचुनि घ्यावें श्रावण महिन्याचे गीत. ll १० ll


— बालकवी

15 comments:

amol nadisht said...

जसे कुठल्याही पूजेत गुरुजी मंत्रपुष्प म्हणतात तसं प्रत्येक मराठी माणूस ही कविता पावसाळ्यात एकदा तरी गुणगुणतोच

श्रीपाद प्र.मुळे (गोंदीकर ) said...

हि कविता मला शाळेत अभ्यासक्रमात नव्हती याचे मला फार वाईट वाटते आहे ....कारण मला मराठी विषयाला खूप विद्वान व रसिक शिक्षक लाभले होते .दोघांची नवे न राहवून उद्धृत करावीशी वाटतात .एक म्हणजे माझे पिताश्री प्रकाश मुळे व दुसरे म्हणजे श्री श्रीकांताराव गोन्दीकर .हे दोन मराठीचे शिक्षक म्हणजे जणू कांही साक्षात सरस्वतीच यांच्या जिन्व्हेवर विराजमान होती .वारंवार त्यांच्या मुखातून अभ्यासक्रमात नसतानाही या कवितेच्या ओळी ऐकल्या आहेत .थोडाबहुत अर्थही जाणून घेतला आहे .पण आज हि कविता या ब्लॉगवर पूर्ण वाचायला मिळाली .संग्राहकाला शतशःधन्यवाद

Suresh Shirodkar said...

@ मुळेजी,
तुम्हाला हि कविता अभ्यासक्रमात नव्हती म्हणून वाईट वाटते आहे पण मला ही कविता अभ्यासक्रमात असल्याचा आनंद आहेच पण त्याहीपेक्षा हा "बालभारती" संकलनाचा उपक्रम याच कवितेमुळे सुरु झाल होता याचा जास्त आनंद आहे. श्रावण महिना सुरु झाला की बालकविंच्या ह्या कवितेची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

Unknown said...

आला श्रावण श्रावण हि कविता मिळेल का

Suresh Shirodkar said...

मिळेल. आपला ईमेल आय डि द्या.

Unknown said...

"सायंकाली कुणी कोकिला तरु शिखरी बैसुनी उंच स्वरांने सांगू लागली जगता लागोनी"
ही कविता ज़र कुणास पूर्ण येत असेल तर ख़ालील इ मेल आय डी वर पाठवावी.धन्यवाद
जयवन्त
jaywantwale@yahoo.com

Unknown said...

Mala milel ka

Unknown said...

एक कविता आठवते--
खुजबुज खुजबुज खुजबुज रे
चंदनाच्या झाडाखाली माती का गळे.

ही कविता कुणाची? पुढच्या ओळी काय?
Thank you.

पुरुषोत्तम काळे said...

श्रावणमासी ह्या कवितेतील एक शब्द "पुरोपकंठी'ह्याचा अर्थ काय.कवित्तेत खालून चौथ्या ओळीत हा शब्द आहे

vishal nannaware said...

सोबती तुम्ही मिळून चालणे मिळून बोलणे ..ही कविता मिळेल का ..2006-07 मध्ये 6 वी किंवा 7 वी ला होती ..plz

Sachin said...

Namaskar sir
Saraswati Vandana
"He isha tuze he stawan"

He geet ( kavita) milel ka
sachindrane@gmail.com


Ajun Ek kavita hoti
Tyamadhe shabdanchi takat sangitali hoti.
Vaparun vaparun shabdanchi takat kami hote
Mhanun parat shabda lihayachi garaj aahe. Asa tyach arthi hota.
Tee kavita milel ka?

नामदेव कोळी said...

केवळ अप्रतिम,

Unknown said...

परसातील कुंड्यात सकाळी दिवे लावले कुणी, बिन वातीचे बिन तुपाचे निरांजना वाचीने, मज न कळे या दिव्या दिव्यांची कशी मौज थाठते, या आरतीने ओवाळावे देवाला वाटते... ही कविता माहीत असेल तर कृपया सांगा

Unknown said...

सर मला एक कविता हवी होती मोहरा इरेला पडला,बाजीप्रभू यांचा पोवाडा.

Suresh Shirodkar said...

बेलाग दुर्ग जंजिरा वसईचा किल्ला असला
दुश्मन फिरंगी तिथला आटोपेना कोणाला
त्या सिंहाला पकडाया भारतीय चिमणा सजला
गोव्याचा टोपीवाला कोंकणचा पगडीवाला
लागली झुंज उभयाला बुद्धीचा डाव उडाला
मोहरा इरेला पडला ||१||

बोलावूनी सरदारांना तो समरधुरंधर बोले
शूरांनो वेढा द्याया चारमास होऊनी गेले
बेहीम्मत जे असतील परतोनी ते जातील
जा कळवा की दादाला मोहरा इरेला पडला ||२||

तोफेच्या तोंडी माथे बांधोनी उडवा हाथे
शीर तुटुनी त्या आघाते किल्ल्यात पडूद्या त्याते
ती निर्वाणीची वाणी डोळ्यास आणि पाणी
प्रत्येक वदे गहीवरुनी इर्षेस वीर हा चढला
मोहरा इरेला पडला ||३||

गोळ्यांच्या मार्याखाली चर खोदोनी रेतीत
उडविले सुरंगी बार तट लोळविला मातीत
गर्जना एकदम झाली पडलेल्या खिंडारात
जो बांध तटाचा फुटला तो सेनासागर सुटला
धैर्याचा किल्लेवाला बंदुकीस भाला भिडला
मोहरा इरेला पडला ||४||

मर्दच्या मराठी फौजा रणकीर्ती जणांच्या गाव्या
जणू घोंगावत मधमाश्या मोहोळाला बिलगाव्या
कडकडात वरुनी व्हावा सारखा अग्निवर्षावा
परी तो सिंहाचा छावा परतेना हिम्मतवाला
मोहरा इरेला पडला ||५||

वारावर करतची वार अनुसरले शूर पवार
शिंद्यांचा खांदा घोडा चालला जणू की तीर
बावटा धरुनी तोंडात भोसले चढे जोमात
आगीच्या वर्षावात सामना भयंकर झाला
मोहरा इरेला पडला ||६||

गरनाळी तोफा मोठ्या धुंकार कराया सजल्या
घायाळ धडाधड खाली तनु कितक्यांच्या धड्पडल्या
धातीचे निधडे वीर चिंध्यापरी त्यांच्या झाल्या
पगडीची फौज हटेना क्षत्रुची पकड सुटेना
तो विजयश्रीचा चिमणा बेहोष होऊनी लढला
शौर्याची शर्थ जहाली बावटा तटावर चढला
जयनादाने वसईचा दिग्प्रांत पहा दुमदुमला

तो समय आणि ती मूर्ती ठाके कवीनयनापुढती
मोहरा इरेला पडला ||७||

- कै. दु, आ. तिवारी यांच्या मराठ्यांची संग्रामगीते ह्या काव्यसंग्रहातून